राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन
पुणे ः देशातील जमीन वाढणार नसल्यामुळे पिकांच्या क्षेत्रविसताराला मर्यादा येतात. राज्याचा ऊस गाळप हंगााम १५० दिवसांवरून कमी हाोत १०० दिवसांवर आला आहे. त्यामुळे कारखान्यांचा गाळप हंगाम अधिक दिवस चालण्यासाठी उाची उत्पादकता वाढ कराण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने साखर उद्योगाने उद्दिष्ट ठेवून वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्यस्थापनचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.(विस्मा) साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) यावरील एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दुपारच्या सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणार्या साखर कारखान्यांना व अधिकार्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये दालमिया भारत शुगर कोल्हापूर, जागृती शुगर लातूर, श्रीनाथ म्हस्कोबा (दौंड पुणे), श्री गुरूदत्त शुगर (कोल्हापूर) आणि दौंड शुगर पुणेे यांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडे नुकताच जैव ऊर्जा, जैव इंधन धोरणाचा प्रस्ताव पाठविला असून, त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांसाठी समभाग साहाय्य, भागभांडवल, व्याजात सवलत, तसेच जीएसटी व मुद्रांक शुल्कात सूट देण्याचा समावेश आहे. हा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. - डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त
राज्यात काही कारखान्यांकडून अनिष्ट प्रथा पाडून त्यांनी गरज नताना सुधारणेच्या नावाखाली ऊस गाळप क्षमतावाढ केली आहे. कारखान्यांनी नवे तंत्रज्ञान व सूक्ष्म सिंचनाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरातून उसाच्या उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रित करावे. साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार खंबीरपणे मागे उभे आहे. - बाबाासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य
राज्यात १०० टनापेक्षा अधिक क्षमतेचे गुर्हाळे असताच कामा नये. त्यांनाही ऊस दर नियंत्रण कायद्याच्या कक्षेत आणावे. गतवर्षी ऑईल कंपन्यांनी राज्यातून ११६ कोटी लिटरइतकेच (३० टक्के) इथेनॉल खरेदी केले. तो कोटा वाढवावा आणि साखर विक्रीचा (एमएसपी) क्विंटलचा दर ३१०० वरून ४३०० रूपये करण्यात यावा. - आमदार दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, व्हीएसआय (पुढारी, ३१.०५.२०२६)